Wednesday, 25 May 2016

शेतकऱ्याची मुलाखत 

या वर्षी मे महिनाच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो . आणी त्यामुळेच मला आयती शेतकऱ्याची मुलाखत घेता आली . पण ही  मुलाखत  होती कोकणातील शेतकऱ्याची . माझ्या आईचे मामा शेतकरी असल्यामुळे मला सहजपणे मुलाखतीसाठी वेळ मिळाली.  त्या शेतकऱ्याने मला जे काही सांगितले तो माझ्यासाठीचा एक उत्कृष्ट अनुभव ठरला . या मुलाखतीची सुरवात त्यांच्या नावाने झाली  .  आणि जवजवळ ४५ वर्षांचा दांडगा अनुभव माझ्यासोबत शेअर केला . त्या शेतकऱ्याचे नाव अनंत दत्ताराम एकावडे . १९७५ साली त्यांनी आपले १२ वी चे शिक्षण पूर्ण केले . त्यानंतर मात्र घराच्या हलाखीच्या परिस्तिथी मुळे शेतीकडे वळायला लागले . त्यांचे इतर मित्र  चांगल्या नोकरीवर लागले आणि आपण मात्र शेतकरी बनून राहिलो या गोष्टीचे त्यांना वाईट वाटते . ते म्हणतात शेती व्यवसायात गुंतुवणूक आणि भविष्यात त्यापासून किती नफा मिळेल याचा अंदाअ  आपल्याला घ्यावा लागतो . हा दृष्टीकोन काही शेतकऱ्यांकडे नसतो ,त्यामुळे ते आत्महत्या करतात .त्याचप्रमाणे विदर्भातील शेतीची जमीन आणि कोकणातील शेतजमीन यातील विदर्भातील जमीन ही  शेतीसाठी अधिक सुपीक आहे . त्यामुळे विदर्भातील शेतकरी पूर्णपणे शेतीव्यवसायावर अवलंबून असतात ,तर कोकणातील शेतकऱ्याना उदरनिर्वाहासाठी शेतीसोबत पूरक व्यवसाय करावा लागतो .   आपल्या अनुभवातून सर्व गोष्टी ते  शिकले   . ते म्हणतात आपल्याला  दुसऱ्यांना पाहून स्व;वर त्या गोष्टींचा प्रयोग किंवा अनुकरण  करावे  लागते  . हाच प्रयोग त्यांनी शेतीवर केला . ते म्हणतात आम्ही गावातील शेतकऱ्यांनी  शेत कापण्यासाठी, कामगारांचा खर्च वाचवण्यासाठी एक युक्ती केली आहे  . आम्ही गावातील १०-१२ शेतकऱ्यांनी मिळून एक संघ तयार केला आहे . आणि आम्ही प्रत्येकजण कापणीच्या वेळी एका -एका शेतकऱ्याच्या घरी जातो ,यामुळे कापणीचा खर्च  वाचतो.  . ते म्हणतात  सरकारी योजना पूर्णपणे आमच्यापर्यंत पोहचत नाही ,सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत फार कमी प्रमाणात आमच्यापर्यंत पोहचते .  सर्व शेतकर्यांना एवढच सांगू इच्छितात की रासायनिक खतांचा वापर कमी प्रमाणात करावा ,त्याएवजी पारंपारिक खतांचा वापर अधिक प्रमाणात करावा ,त्यामुळे शेतीसाठी फायदा होतो . 







2 comments: